Jump to content

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवोदित मराठी साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. परिषदेच्या वतीने अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते.परिषदेचे अध्यक्ष काम केले. परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त व वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महा कादंबरीचे लेखक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने रत्‍नागिरी, सोलापूर, बारामती , लातूर, तुळजापूर, धाराशिव, वणी, पुणे या ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन झाली. राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या नेत्तृत्वात ही संमेलन आयोजित केली जातात,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी २७ वर्ष संमेलन संयोजनात आपले महत्वपूर्ण योगदान दिले अल्पशा आजाराने श्री काळभोर यांचे निधन झाले,हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणी हे संमेलन आयोजित केले जाते,अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे व कवींचे संमेलन असते आत्तापर्यंत या नावाने ३० अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलने आजवर विविध ठिकाणी संपन्न झाली आहेत.पुणे,वाशी (नवी मुंबई) नांदेड,उदगीर,औरंगाबाद,संगमनेर,रत्‍नागिरी,बारामती, सोलापूर,लातूर,तुळजापूर,धाराशिव,वणी (यवतमाळ)जव्हार,शेवगाव,सांगली,मंठा,नागपूर,यामध्ये वरील ठिकाणांचा समावेश आहे,

हे आणि या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने

[संपादन]
  • २१वे : लातूरला, २५,२६, २७ जुलै, २०१४; संमेलनाध्यक्ष प्रा. भास्कर चंदनशिव
  • २०वे : उस्मानाबादला, २१, २२ मे २०१३; संमेलनाध्यक्ष राजन खान; उद्‌घाटक रा.रं. बोराडे
  • १९वे : सोलापूरला, १८ ते २० मे २०१२; संमेलनाध्यक्ष : लक्ष्मण माने; स्वागताध्यक्ष शिवाजी सावंत
  • १८वे : बारामतीला,१९ ते २१ ऑगस्ट, २०११; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह. साळुंखे
  • १७वे : रत्‍नागिरीला, १५ ते १६ मे, २०१०; संमेलनाध्यक्ष : प्रा. रामनाथ चव्हाण
  • १६वे : संगमनेरला, २८ मे २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ. नरेंद्र जाधव
  • १५वे : औरंगाबादला, २४ ते २५ मे, २००८; संमेलनाध्यक्ष : डॉ. विठ्ठल वाघ
  • १०वे : पुण्याला, १९ ते २० मे , २००३; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं. बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, रतनलाल सोनाग्रा, वगैरे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

[संपादन]

महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते. 'नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाचहून अधिक वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड येथे गेली चारहून अधिक वर्षे.
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
  • राज्यस्तरीय लोकनेते शरदराव-जी पवार कृषी साहित्य संमेलन, २०१२ पहिले संमेलन बारामती
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन, वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५).
  • राज्यस्तरीय पहिले मराठी साहित्य संमेलन, कळंब, २०१२; - अध्यक्ष : ?

पहा :मराठी साहित्य संमेलने